Breaking News
Loading...
Wednesday, October 15, 2008


काही ख़ास नाही पण मला हे शब्द रुततात कुठे तरी आणि ती आठवण ही ......!!




एक मुलगी होती सुंदर अशी

खुप प्रेम करत होतो मी तिच्यावर

तिलाही मी आवडायचो

आणि बस एकदा प्रेमाची मागणी घातली

मग काय "नाही" शब्दच येणार नव्हता

फार काळ नाही पण एक नातं होतं आमच्यात

असं मला तरी वाटतं होतं

प्रेमाचं ....कदाचित .... तुटन्याचं ....

एकदा तिने मला सांगितले

माझं आता लग्न ठरणार आहे

मग काय मी म्हणालो तुझ्या बाबांशी बोलू का ?

नको जर आजच बोललास तर आपलं भेटन पण त्रास दाई होइल ...

ठीक आहे मग काय करू ?

बघुया बाबा काय म्हणताय पाहिले ?

मी बाबांशी विचारना करेन

नाही म्हणाले तर आपण पळुन लग्न करू ..काय ?

हो मी ही तेच म्हननार होतो ...मग ठीक आहे

काही दीवासांनी बातमी लागली लग्न गावालाच झालं

लोनावळ्याला हनीमून पण झाला ...हीच ख़बर लागली ..इतरांकडून ...

आणि बस मी रडायला लागलो ....

आणि आज २ वर्षा नंतर ती मला आज दीसली

लांबुनच नजर मिळवलि आणि पुन्हा मान खाली घातली ....

जसे कोणी अनोळखि मानुसच आहे ...

आता मात्र नंतर लक्ष गेलं

तिच्या हातात एक लहान मुलं ही होतं

एक गोंडस असं "गोजिर्वान्" ...

म्हणुन मी प्रेमावरचा वीश्वास काढून टाकला

आणि तिथून तिच्याशी काही न बोलता निघून गेलो

मग काय करावं मी ? तुम्हीच सांगा ...

सारं काही विसरून जावं आणि .....आणि ......आणि.... ....

0 comments:

Post a Comment